
चिपळूण : चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाचे काम अंतिम टप्प्यात आहे. निधीच्या कमतरतेमुळे गाळ उपसा कामाला ब्रेक लागणार की काय अशी शक्यता निर्माण झालेली असतानाच शासनाच्या जलसंपदा विभागाने शुक्रवारी चिपळूणकरांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाशिष्ठी नदीतील गाळ व बेटे काढण्यासाठी ४ कोटी ८६ लाख १६ रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या मंजुरीमुळे वाशिष्ठीतील गाळ काढण्याचे काम नियमितपणे
गाळ व बेटे काढण्याच्या कामाला मिळणार गती, निधी तात्काळ वर्ग करण्याची मागणी
सुरू राहाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा निधी शासनाने तात्काळ संबंधित विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी चिपळूणवासियांकडून होतं आहे.