✴️गडचिरोलीत वीज पडून पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Spread the love

⏩️गडचिरोली- लग्न कार्यक्रम आटोपून गावाकडे परत जात असताना झाडाखाली थांबलेल्या पती-पत्नी आणि दोन मुलांवर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

भारत राजगडे (35 वर्ष), अंकिता भारत राजगडे (28 वर्ष), बाली भारत राजगडे (2 वर्ष), देवाशी भारत राजगडे (4 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. भारत राजगडे हे आपल्या पत्नीसह दोन मुलांना घेऊन लग्न कार्यक्रमासाठी गेले होते. लग्नावरुन सायंकाळी गावाकडे परत जात असताना अचानक मेघगर्जना आणि वादळ सुरू झाले. त्यामुळे त्यांनी रस्त्यालगच्या झाडाचा आसरा घेतला. यावेळी वीज कोसळल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने आमगाव बुटी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page